शेतकऱ्याला दिवसाची लाईट भेटावी याकरता स्वाभिमानीचे उद्या प्रदेशाध्यक्ष पूजाताई मोरे यांच्या नेतृत्वात औरंगाबाद विद्युत वितरण विभागीय कार्यालयावर "रुमणे आंदोलन" करण्यात येणार आहे. या आंदोलनाबाबत माहिती देताना पुजा मोरे म्हणाल्या की, "आपण दिल्लीत बघतोय काय होतय पण सांगते शेतकऱ्यानं मनात आणलं तर संपुर्ण जग बंद पाडू शकतो. आज बीड जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचा बीबट्याच्या हल्ल्यात जीव जात आहे. आणि सर्व फक्त अपूऱ्या वीज पुरठ्यामुळे होतयं. आता बापाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलंच पाहिजे आणि या साठी जर गोळी झेलावी लागली तर शेतकऱ्यासाठी पहिली गोळी झेलायला मी तयार आहे." असं पूजा मोरे यांनी म्हटलं आहे.
पाहा पूजा मोरे यांचं आवाहन..
Updated : 30 Nov 2020 7:30 AM GMT
Next Story