राज्यात मागील काही दिवासांपासून पावसाने उसंत घेतली आहे.

मात्र पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

याबाबत हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे पश्चिम व मध्य भारतातून प्रवासाची शक्यता आहे.

त्यामुळे राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तर राज्यात ३० ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढणार असल्याच देखील म्हंटल आहे.

परभणी, नाशिक, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.